Order of Merit. 123456 Báláji Pándurang Manakshá Beirámji Govardhan Lakshuman Khanderao Moroji Nárayan Balál Normal (or 3rd Year's) Class. ESSAY ON "THE DISADVANTAGES OF AN 6 Nushirwánji Naoroji 7 Nárayan Bhái Value. Matter. 30 30 25 25 50 23 20 24 20 45 44 42 22 20 42 22 19 41 18 19 37 15 35 No. I. "On the Disadvantages of an Education exclusively English." एतद्देशीय लोकांचा मुलांस केवळ इंग्लिश भाषेतच णकोणते तेाटे होतील याविषयों. सांप्रत काळीं एतद्देशीय लोकांची जी स्थिति आहे. तिजवरून पाहिलें असतां मला वाटतें कीं, त्यांस केवळ इंग्लिश भाषेतच जर विद्या शिकविली तर त्यांपासून तोटे फार होतील; ही गोष्ट विचारशील पुरुषांचा लक्ष्यांत आल्या वांचून राहणार नाहीं. आतां कोणी कदाचित् पृछाकरील कीं. एतद्देशीय लोकांचा मुलांस केवळ इंग्लिश भाषेतच विद्या शिकविली असतां त्यांस तोटे होण्या जोगी अशो त्यांची स्थिति तो कोणती? तर माझानें जितके थोडक्यांत तिचें वर्णन करवेल तितकें मीं करिता . हें तर सर्व सुज्ञ पुरुष कबूल करितात कों, सांप्रत हिंदू चें प्राचीन वैभव आ णि प्रतिष्ठा यांचा दिवसानुदिवस हास होत चालला आहे. त्यांचीं सर्व प्राचीन विद्यादिकें पुस्तकांतूनमात्र राहिलीं आहेत. विद्या म्हणजे काय पदार्थ याविषयीं सर्व लोक अनभिज्ञ होत चालले आहेत. महान् महान विद्वानांनों जन्माचे जन्म खर्चून जे ज्योतिषशास्त्रादिकांसारिखे ग्रंथ सिद्र करून ठेविले आहेत, त्यांस हतभाग्य हिंदूंमध्ये अवलोकन करणारही को णी राहिला नाहीं. सारांश, जा भाषेत ते मोठमोठाले ग्रंथ लिहिले आहेत तिचाच, कांहीं प्राचीन विद्यापीठे आहेत त्यांखेरीज इतर ठिकाणीं केवळ लोप झाला आहे. जापेक्षां भाषेचाच लोप झाला, त्यापेक्षां जाविद्यांचा त्याभाषेत संग्रह केला असेल त्यांचाही लोप होण्यास अर्थात् कां राहवा ? आतां कोणी माझा वरीलविद्येविषयीं उक्तीस दोष ठेवील कीं, अशा विद्या तुम्हीं म्हणतां त्या कोणत्या ? त्या काय हालीं जा इंग्लिश भाषेचा द्वारें प्राप्तहोतात तशा तर नव्हेतनां ? होय, ही गोष्ट खरी; वस्तुतः हिंदुलोकांचें विद्य विषयों ज्ञान अल्प खरें; परंतु हेंच जर अल्प ज्ञान या हतभाग्यांनीं दृद्धिंगत केलें असतें, तर सांप्रत त्यांची अशी दशा होती काय? जे आपले सांप्रतचे प्रभु आहेत, त्यांमध्ये अशोच किं बहुना याहूनही अधिक या ज्ञानाची पुव उणीव होती. असो, हो विद्येची दशा बरें, संपत्ति जर पाहं गेलें. तर तिजविषयीं हो तशोच हांकाहांक. जाहिंदुस्तानाचें नाव संपत्तोवि षयीं फार प्राचीनकाळीं चें हेंांकडे गाजलें होते; त्याच हिंदुस्तानांतील लो कांस आतां फक्त पोट भरण्याची देखोल पंचाईत पडत चालली आहे. जें हिंदुस्तान प्राचीनकाळीं ऋषिकर्म व कापसाची उंची उंची वस्त्र करणें इत्यादि धनत्तर कारखाने चालवून नानातर्हेचे पदार्थ उत्पन्न करून परदेशीय लोकांशी व्यापारं करित असे; त्याच हिंदुस्तानांतील लोकांस हा . नों तेच जिन्नस परदेशीय लोकांपासून विकत घ्यावे लागतात. यापरोस आणखी संपत्तिचा लय होणें तो कोणता ? त्यांचा धर्माविषयीं जर विचार करू' गेलें, तर त्याविषयींचें पराकाष्ठेचेंच अज्ञान आढळतें. प्राचीन लोकांस धर्मसंबंधीं थोडेंच अज्ञान होतें, होगोष्ठ त्यांतील महान् पंडितांचा ग्रंथांवरून सुज्ञांचा तत्काल ध्यानांत येईल. परंतु त्यांचा वंशजांत तें अज्ञान दसपट वाढले आहे. आणि माझें तर मत असें आहे कीं, सांप्रत अशी हिंदूंची दशा होण्यास कारण धर्मसंबंधी अज्ञान. हें धर्मज्ञान, हाल्लों जातींचा संख्येची जी अतिशय वृद्धि झाली आहे, तिचावरून उघड दिसून येतें. या जाती इतक्या वाढल्या आहेत कीं. प्रतिव्यक्तीस एक एक निरनिराळी जाति होऊन एकलोकत्वाचा लोप होण्याचा समय प्राप्त झाला आहे. इतक्या परिणामास हिंदू ंचा धर्म येऊन पोहोचला आहे. हिंदुलोकांचा रीतीभातींविषयीं मला लिहिणें नलगे. धर्म, विद्या आणि संपत्ति, या तोन गोष्टींविषयीं मीं संक्षिप्त वर्णन केलें आहे त्यावरून त्यांचा रीतीभाती कोणत्या प्रकारचा असाव्या, याविषयीं व हालीं ते सुधारणुकेचा कितव्या पायरीवर आहेत याविषयों सुज्ञ लोक सहज परीक्षा करतील, याप्रकारची हिंदची साधारण अवस्था आहे. आतां मला वाटतें कीं प्रस्तुत मला लिहावयाचा जो मुख्य विषय त्याविषयीं तजविजीनेंच लिहिलेंपाहिजे. कारण, माया प्रख्यात विद्वानांची त्याविषयीं अद्याप एकवाक्यता झाली नाहीं. तथापी जें योग्य वाटेल तेंच मला लिहिणें प्राप्त आहे. मला वाटतें, हिंदु लोकांत केवळ इंग्लिश भाषेतच विद्या शिकविण्याचा प्रघात पडला तर त्यापासून त्यांचा फार तोटा होईल. हिंदू सारख्या लोकांस विद्या शिकवून त्यांची सुधारणा करावी, हाच जर कोणत्या एकाद्या सरकारचा मुख्य उद्देश आहे, तर परभाषेतच तो विद्या शिकविलो असतां फल होणार नाहीं. आतां, सांप्रतचा आमचा सरकारचा शाळा घालण्याचा हेतु हा आहे कीं, त्यांत जे तरुण लोक शिकतील, त्यांणीं परभाषेत अज्ञान संपादन केलें असेल, त्याचा स्वभाषेचाद्वारें प्रसार होण्यास साधनभूत व्हावें. तेव्हां त्यांस केवळ इंग्लिश भाषेतच जर विद्या शिकविली तर हा हेतु सिद्धीस जाईलका ? असा जो सरकारचा लोकोपकारक उद्देश तो सफल क रण्या विषयों याप्रकारचा शिक्षित तरुण कोणत्या तरी प्रकारें उपयोगी पडेल काय? बाळपणा पासून केवळ इंग्लिश भाषाच शिकलेल्या मनुष्यास स्वभाषेचें ज्ञान कोणत्या उपायांनीं प्राप्त व्हावें ? आणि स्वदेशीयांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्या विषयीं त्याणें करें साधनभूत व्हावें ? त्याणें अन्य भाषेत जें ज्ञान संपादन केलें असेल, त्याचा स्वकीय लोकांचा उपयोगी पडण्या जोगा खभाषेमध्ये संग्रह करण्यास तो समर्थ होणार नाहीं. इंग्लिश भाषा ही अगदीं देशभाषाच करून टाकर्णे हो तर गोष्ट अगदीं अशक्य. कारण, हिंदू'ची संख्या फारच मोठी आहे; आणि हा हेतु तडी स नेण्या करितां जर शिक्षित तरुण लोकांची कांहीं आशा करावी, तर त्यांची संख्या फारच थोडी पडलो. तेव्हां असे जे अल्पसंख्याक इंग्लिश भाषेत शिक्षित ते जर स्वकीय भाषे विषयों अनभिज्ञ असले, तर त्यांच्या हातून सरकारचा लोक कल्याणकारक उद्देश कोणत्या प्रकारें सिद्धीस जाईल, हें मजा नकळे. त्यांस जें परभाषेत ज्ञान प्राप्त होतें, ते खकोय जनास त्यांनां कसें सांगतां येईल? कदाचित अशो हो गोष्ट घडूं शकेल कीं, त्यांस अन्य भाषेत जें समजत असेल तें स्वभाषेंत पुरतें बोलून दाखवितांहो येणार नाहीं . सांप्रत सरकारी विद्यालयांत इंगिश भाषेबरोबरच देशभाषा व संस्कृत भा षेचों मूल तत्वें शिकवत असतांही त्यांत जे शिकत आहेत, त्यांचा अनुभवा स वर सागीतलेली गोष्ट येत असेल . इलिश भाषेत असें एक एक वाक्य कठो ण आढळतें कीं, त्याचा एतद्देशीय भाषेत पुरा अर्थ दर्शवितां येतनाहीं. हें तर नुस्तें' वाक्यांविषयों झाले. मग रसायन शास्त्र सिद्ध पदार्थ विज्ञान शास्त्र, इत्यादिक जा हिंदुलोकांस अद्याप केवळ अज्ञात अशा विद्या त्यांविषयीं त र काय विचारावें ? तस्मात्त्या तरुण लोकांस वकीय भाषा यथास्थित शिक ल्या वाचून गत्यंतर नाहीं. तेव्हां फक्त इलिश भाषाच जर शिकविली तर सर कारचा हेतु सिद्बोस नजाणे हाच कायतो त्यापासून मुख्य तोटा होईल . या पुढें आतां मीं जे तोटे दाखवोन, ते याचा पोटांतले होत. आतां केवळ इंग्लिश भाषेतच जेथे विद्या शिकवितात, अशा शाळा आहे त, तेव्हां त्यांजमध्ये एकाद्या शिकलेल्या मनुष्यास सामान्य हिंदुलोक कसा मा नितात याविषयीं मी लिहितों. असा एकादा तरुण मनुष्य जेव्हां साधार ण हिंदुलोकांचा मंडळांत जाता, तेव्हां त्यास ते प्रथमच पाह्रो असें म्हणूं ला गतात; आणि त्यांतून त्यास स्वभाषेचें ज्ञान कमी आहे, असें जर त्यांस समज लें, तर ते लागलेच त्याचा उपहास व धिक्कार करू लागतात याप्रकारें प्रथम च त्यांजवर त्याचें वजन पडेनासें होतें. मग त्याणें जर इंग्लिश भाषेतील एका दा विषय काढला, तर ते त्याकडे कान देखोल देतनाहींत. याकरितां जर कोणाएकास असल्या समाजास कांहीं विषय प्रतिपादन करून दाखवाव याचा असला, तर त्याणें मनांत दोन गोष्टो वागविल्या पाहिजेत. एक तर तो विषय जितका सुलभ होईल तितका करून सांगोतला पाहिजे ; व दुसरें अ सें कीं आपल्या वाकबलानें तो विषय त्यांस आवडण्या जोगा केला पाहिजे. या दोन ही गोष्टो स्वभाषेचें चांगलें ज्ञान असल्याविना सिद्धीस जाणार ना होत. याप्रमाणे स्वभाषेचें जास ज्ञान नाहीं अशा मनुष्यास स्वकीय लोकांचा समाजामध्ये उभं राहून संभाषण करण्याचा प्रसंग आला, तर त्याचा स्वभा षेचें त्यास ज्ञान नसल्या मुळे त्या प्रसंगों त्यास किती अडचणो प्राप्त होतो ल, याविषयीं तुम्हास सहज कल्पना करितां येईल. अशासमयीं सर्व लोकां चा कल्याणार्थ एकाया महत्कार्यास त्याणीं आस्था पूर्वक मनापासून सा हाय्य करण्यास तात्काल उद्युक्त व्हावें, इतकीं आपल्या वाणोचा चातुर्थे क रून व माधुर्ये करून त्यांचीं मनें जागृत करणें अथवा उत्तेजित करणें, हो गोष्ट त्याचा हातून घडणें परम अशक्य . एतद्देशीय लोकांमध्ये उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करण्यास जेउपाय आहेत त्यांतले मुख्य हे आहेत - त्या लो |